मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात ८३ शिवभोजन केंद्रामार्फत गरीब व गरजूंना मे २०२१ पर्यंत मध्ये एकूण ५,२३,१३३ शिवभोजन थाळींचं वाटप करण्यात आलं आहे.
राज्यात १ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये गरीब व गरजूंना व्यक्तींना स्वस्त दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेअतंर्गत शिवभोजन जेवणाची थाळी वितरित करण्यात येत आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता कोरोना विषाणूच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत एकूण १९,९०० थाळी प्रतिदिन इतका इष्टांक मंजूर आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनच्या प्रक्रीये अंतर्गत ६ एप्रिल २०२१ पासून ग्राहकांना शिवभोजन पार्सल (Take Away) सुविधेद्वारे उपलब्ध करुन दिलेली आहे. १५ एप्रिल ते १४ जून २०२१ या कालावधीपर्यत शिवभोजन केंद्रामधून सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत शिवभोजन पार्सल सुविधा सुरु राहील.
हेही वाचा- खाजगी रुग्णालयांमार्फत लसीकरण शिबिरे आयोजित करा, पालिकेची गृहनिर्माण संस्थांना विनंती
(more than 5 lakh shiv bhojan thali distributed in thane and mumbai)