कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच राज्यातील सरकारी यत्रणांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं गर्दी कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. त्यानुसार, राज्यातील पार्क, जिमखाने, थिएटर्स, जलतरण, प्रार्थनास्थळं यांसारखी गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच एसटी प्रशासनानं देखील खबरदारी घेत, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठक व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना प्रवास करण्याच्या दृष्टीनं काही आसनं बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच, गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बसमधून उभं राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे.
यासंदर्भातील परिपत्रक नुकतंच महामंडळाच्या वाहतूक शाखेनं आपल्या स्थानिक प्रशासनाला पाठवून दिलं आहे. एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीनं या पूर्वीपासूनच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
एसटीच्या उपाययोजना
या उपाययोजनांसह गर्दीच्या वेळी प्रवाशांमधील संभाव्य संसर्ग टाळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या बसमधील बैठक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. बसेसच्या प्रत्येक २ आसन क्षमतेच्या बैठक व्यवस्थेवर केवळ एकच प्रवासी बसवण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण बसमध्ये बस क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून, ती बस मार्गस्थ करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले
कोरोना बचावसाठी 'या' आमदाराने त्याचं संपूर्ण वेतन जनतेला दिलं