मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवारी पावसानं तुफान हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत ढघाळ वातावरण होतं. सोमवारी दुपारी पावसानं जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट दुर होण्याची शक्यता आहे.
#MumbaiRains #mumbaimonsoon #mumbairainslive #MumbaiMeriJaan #mumbaitraffic
— Corona Warrior--TheJaypeeSingh (@jayprakashindia) August 17, 2020
मुम्बई के वेस्टर्न सबर्ब्स में जोरदार बरसात हो रही है
बान्द्रा से विलेपार्ले और माहिम ,धारावी,कुर्ला इलाको में तेज बरसात हो रही है
मौसम विभाग ने अगले 24 घंटे लगातार बरसात का अलर्ट दिया है pic.twitter.com/AJDeYyOqYU
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून मुंबईत पावसानं तुफान बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातील पडलेल्या पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत प्रचंड पाणी साचलं. चाळीत, इमारतीत पाणी शिरल्यानं अनेकांचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान, मुंबईत सोमवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
#mumbairain #MumbaiRainsLive https://t.co/w4fBna7fkK
— Mumbai Rain (@MumbaiRainApp) August 17, 2020
जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले. मात्र तोपर्यंत तलावांची पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने ५ ऑगस्टपासून मुंबईत वीस टक्के पाणी कपात लागू केली आहे. परंतु, आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने तलावातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
हेही वाचा -
मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव