Advertisement

मुंबईकरांसाठी खूशखबर ! पाणीपुरवठा करणारे हे धरण ओव्हर फ्लो

तुळशी तलावाची पाणी साठवण क्षमता ८०४६ दशलक्ष लीटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

मुंबईकरांसाठी खूशखबर ! पाणीपुरवठा करणारे हे धरण ओव्हर फ्लो
SHARES

मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तलाव भरून वाहायला लागला आहे. चांगल्या पावसामुळे तुळशी तलावातील पाणी सोमवारी रात्री ओसंडून वाहू लागले आहे. मागील वर्षी तुळशी तलाव ९ जुलैला भरला होता. यंदा तलाव भरायला २८ जुलैचा दिवस उजाजावा लागला. तुळशी तलावाची पाणी साठवण क्षमता ८०४६ दशलक्ष लीटर इतकीच आहे. मुंबई शहराला एका वर्षासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर दररोज ४५०० दशलक्ष लिटरची गरज भासते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३९०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.

हेही वाचाः- पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबई आणि शहर परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, सातपैकी एक अर्थात तुळशी तलाव पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी दिलादायक बाब आहे. काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढला आहे. तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढू लागला आहे. एप्रिल - मे महिन्या दरम्यान तलावातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे मुंबईला पाणीपुवरठा होणार की नाही, अशी चिंता होती. मात्र, राखीव साठ्यातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता चांगला पाऊस झाल्याने आणि तलावात चांगला साठा झाल्याने पाणीप्रश्न तुर्तात मिटला आहे.

हेही वाचाः- मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस

मुंबईला वर्षभर पाणी पुरण्यासाठी तुळशी, तानसा, मोडक सागर, भातसा ही धरणं भरावी लागतात. त्यासाठी नाशिक जिल्ह्याचा पश्चिम आणि ठाणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात चांगला पाऊस होणं गरजेचं आहे. तुळशी, तानसा यानंतर आता भातसा आणि मोडक सागर ही धरणं भरणं गरजेचं आहे. ही धरणं भरल्यास मुंबईचा वर्षभराचा पाणी प्रश्न संपुष्टात येतो. तरी दरवर्षी मे महिन्यात महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यास संदर्भात नागरिकांना सूचना केल्या जातात. यंदाच्या पावसाचा विचार केला तर, कोकण आणि घाट माथ्यावरील कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडला तर, कोठेही चांगला पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यात भातसा आणि मोडक सागर ही धरणं भरावीत, अशी प्रार्थना मुंबईकर करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा