पावसाळा सुरू होण्यास अजून चार महिने शिल्लक आहेत. पण शहराला पाणीपुरवठा करणारे सात तलाव सध्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या 51% पाणीसाठ्यावर आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी किंचित वाढली आहे. 2024 आणि 2023 मध्ये तलाव अनुक्रमे 50% आणि 45% पाणीसाठ्यावर होते. पण, अधिकाऱ्यांना चिंता आहे की वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढू शकते आणि पाण्याचा साठा आणखी कमी होऊ शकतो.
गेल्या वर्षी, जून आणि जुलैमध्ये शहरात पाण्याची कमतरता होती. याचा परिणाम की, दोन महिने 10% पाणीकपात करण्यात आली होती. ज्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. म्हणून, शहराचा पाणीपुरवठा राखण्यासाठी बीएमसीने जुलैमध्ये भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधील राज्य-वाटप केलेल्या राखीव साठ्यातून पाणी काढण्यास सुरुवात केली होती.
सोमवारपर्यंत, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण 7.39 लाख दशलक्ष लिटर (एमएल) पाणीसाठा आहे, जो जुलै अखेरपर्यंत शिल्लक राहिल अशी अपेक्षा आहे. तथापि, सध्या सुरू असलेल्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढू शकते, ज्यामुळे पाणीपुरवठा जलद कमी होऊ शकतो अशी चिंता महापालिका अधिकाऱ्यांना आहे.
पालिकेने नागरिकांना पाण्याचा अपवय टाळण्याचे आव्हान केले आहे. बीएमसी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सात तलावांमधून शहराला दररोज 3,950 एमएल पाणी पुरवते. शहराला दरवर्षी 14.47 लाख एमएल पाण्याची आवश्यकता असते.
हेही वाचा