Advertisement

आता जणगणनाही होणार डिजीटल

भारतात प्रथमच १६वी जनगणना पूर्ण डिजीटल होत आहे.

आता जणगणनाही होणार डिजीटल
SHARES

भारतात प्रथमच १६वी जनगणना पूर्ण डिजीटल होत आहे. त्यामुळे विविध पॅरामीटरवर जनगणनेचे आकडे एक किंवा दोन वंशाच्या कालावधीत जारी करणं शक्य होणार आहे. यंदा घराचे छत, फरशी, भिंती, गॅस, वीज, पाणी, घर कोणाच्या नावाचे, भाड्याचे की मालकीचे, घरातील कोणाकोणाच्या नावानं बँक खाती आहेत, अशी विविध माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणनेचं काम तीन टप्प्यात केलं जाणार आहे.

डिजीटल डेटा गोळा करण्यासाठी ३० लाख कर्मचारी अँड्राईड आधारित स्मार्टफोन अथवा टॅबचा उपयोग करतील. त्यासाठी विशेष अॅप विकसित केले गेले आहे. त्यामुळे जनगणना माहितीचे सर्व आकडे भरले आणि ते सेव्ह केले की थेट केंद्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या सेन्सस २०२१ मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंग सिस्टीममध्ये सुरक्षित ठेवले जातील. इंटरनेट नसेल तिथेही हे अॅप काम करेल आणि कर्मचारी इंटरनेट नेटवर्क मध्ये आले की ही माहिती सेव्ह करू शकतील.

यापूर्वी कागदावर माहिती गोळा करून ते आकडे नोंदवून पूर्ण रिपोर्ट तयार केला जात असे. त्यासाठी ८ ते १० वर्षे जात होती. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचे आकडे प्रथम कागदावर जमा केले गेले आणि नंतर ते स्कॅन करून डिजीटल सेव्ह केले गेले. १२१ कोटी नागरिकांची माहिती या पद्धतीनं गोळा करणं हे अवघड काम आहे. या कामासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे सरकारनं गरिबांसाठी आखलेल्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचला नही असे लक्षात आले.



हेही वाचा

बेशिस्त मुंबईकरांवर आता १० हजार कॅमेऱ्यांची नजर

बेकायदा पार्किंगचा दंड झाला कमी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा