खारघर आणि कामोठेसह नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. कारण NMMC मोरबे धरण ते दिघा वॉर्डातील मुख्य पाईपलाईनच्या देखभालीसाठी 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येत आहे.
NMMC च्या पाणी पुरवठा विभागानुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.
मात्र, बुधवारी सकाळी ९ ऑगस्टपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या कालावधीत कामोठे आणि खारघर क्षेत्रातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा