Advertisement

...येथे अत्यावश्यक सेवा देखील पोहोचू शकत नाही!


...येथे अत्यावश्यक सेवा देखील पोहोचू शकत नाही!
SHARES

आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मुंबईतल्या डोंगरीच्या नवरोजी हिल मार्ग येथील बाजार गल्ली परिसरातल्या स्थानिक रहिवाशांनी अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) ची सुरुवात केली आहे. त्याला 'असोसिएशन फॉर दी इंटिग्रेशन अॅण्ड मॅनेजमेन्ट ऑफ सोसायटी' (एम्स एएलएम) असे नाव दिले आहे.

या विभागातील रस्ता चिंचोळा आहे. त्यातच येथे वाहनेही पार्क केलेली असतात. या शिवाय फुटपाथवर दुकान थाटणारे फेरीवाले रस्त्याचा काही भागही अडवतात. त्यामुळे येथे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीला येण्यासाठी जागाच उरत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यावर मात करण्याचे ठरवून ही एएलएमची स्थापना केली, असे स्थानिक युवकांनी सांगितले.


आज नवरोजी हिल मार्ग येथे पावसाळ्यातच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. फेरीवाल्यांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांमध्ये सामाजिक जागरुकता नसल्यानेच या विभागात ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

साबीर हुसेन पुंजानी, उपाध्यक्ष, एम्स एएलएम

साबीर हुसेन यांच्या आई झीनत अफझल 59 वर्षांच्या आहेत. त्यांना किडनीचा त्रास असल्याने उपचारासाठी वेळोवेळी रुग्णालयात न्यायचे असते. पण रस्त्यावर केलेली पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचता येत नाही. यावर मात करण्यासाठी अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटची सुरुवात करण्यात आली आहे, असेही साबीर हुसेन म्हणाले.


या विभागाच्या परिस्थितीबाबत पूर्ण कल्पना आहे. पालिकेद्वारे वेळोवेळी कारवाईही केली जाते. पण परत तीच परिस्थिती निर्माण होते. यासाठी आता पालिका लवकरच 1 स्क्वेअर मीटरची जागा मार्किंग करणार आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिकांचा त्रास कमी होईल.

उद्यकुमार शिरुरकर, सहायक आयुक्त, बी विभाग, पालिका



हेही वाचा -

याला फुटपाथ म्हणायचं का?

माहिममध्ये हरवला फूटपाथ


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा