Advertisement

नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त


नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त
SHARES

गिरगांव - नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्यामुळे कुंभारवाड्यातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. पालिकेची गाडी सकाळी पडलेला कचरा उचलण्यासाठी रात्री येते. तर कधी कधी तो कचरा उचललाही जात नाही. मागील अनेक महिन्यांपासून हीच स्थिती आहे. तसंच त्या नाल्याच्या वाहत्या पाण्याचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे. 'या कचऱ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे', 'यासंदर्भात तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नाही', असं दुकानदार जगतपाल चौरसिया यांनी सांगितलं. तर याबाबत पालिका सी विभाग (घन कचरा व्यवस्थापन) अधिकारी दिव्या जाधव यांना विचारले असता 'परिसराची पाहणी करून रहिवाशांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू' अस त्यांनी सांगितलं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा