Advertisement

वाढत्या कोरोनामुळं राज्यात सोमवारपासून निर्बंध कठोर

कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका (डेल्टा प्लस) व संभाव्य तिसरी लाटेमुळे राज्यात सोमवारपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.

वाढत्या कोरोनामुळं राज्यात सोमवारपासून निर्बंध कठोर
SHARES

कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा धोका (डेल्टा प्लस) व संभाव्य तिसरी लाटेमुळे राज्यात सोमवारपासून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. दुकानं संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील तर संध्याकाळी ५ नंतर विनाकारण बाहेर फिरण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं जूनच्या पहिल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले होते.

रस्त्यावर होणारी गर्दी, लोकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, रुग्णसंख्येत झालेली वाढ, उत्परिवर्तित विषाणूचे आढळलेले रुग्ण यामुळेच निर्बंध पुन्हा कठोर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. नव्या निर्बंधानुसार सध्याच्या ५ स्तराऐवजी राज्याची विभागणी ३ ते ५ अशा स्तरांत करण्यात आली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात पहिल्या व दुसऱ्या स्तरातील सारे जिल्हे आता तिसऱ्या स्तरात समाविष्ट झाले आहेत.

नवी नियमावली:

  • दुकाने आता सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील. 
  • अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार व रविवार दोन दिवस बंद राहतील. 
  • संध्याकाळी ५ वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. 
  • उपहारगृहेही सायंकाळी ४ पर्यंतच खुली राहतील.

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच रुग्णसंख्या किंवा संसर्गदर कमी झाल्यास लगेचच निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. २ आठवड्यांतील रुग्णसंख्येचा आढावा घेऊनच निर्बंध स्थानिक पातळीवर शिथिल करता येतील, अशी तरतूदच नव्या आदेशात करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाहसमारंभ, उपहारगृहे यामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी भरारी पथके  नेमून अशांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंड, भरारी पथके  यातून स्थानिक अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याची भीती व्यक्त केली जाते.



हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शवटची तारीख

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा