Advertisement

पुणे केमिकल कंपनी आग : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे केमिकल कंपनी आग : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत
SHARES

पुण्याच्या मुळशी (Pune Mulashi) तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला (Chemical Company) लागलेल्या आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेशही पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणं कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहचलं. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे.

सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, वॉटर प्युरिफायरसाठी लागणारं केमिकल तयार करते अशी माहिती मिळत आहे. या कंपनीमध्ये जवळपास ३७ मजूर काम करत होते. त्यापैकी १७ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर २० जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्यानं भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळं आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



हेही वाचा

भुलीचं इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

वांद्र्यातील इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा जागीच मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा