Advertisement

संभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी

चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीनं घेतला होता. त्यानुसार त्यांनी बिडीचं नाव बदललं आहे.

संभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी
SHARES

चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीनं घेतला होता. त्यानुसार त्यांनी बिडीचं नाव बदललं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे.

संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचं साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केलं.

अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना संभाजी बिडीचे नाव बदलावं या मागणीसाठी प्रयत्न करत होते. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या मागणीबाबत आंदोलन करण्यात आलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे.

महापुरुषांच्या नावाचा यापुढे कोणीही गैरवापर करू नये, तसं केल्यास संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिला होता. अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरलं जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडनं अनेक वर्षापासून हा विषय लावून धरला होता. कोल्हापुरातही गेल्या वर्षी संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.

राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीनं संभाजी बिडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. पण नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. आता अखेर बिडीचे नाव बदलण्यात आले आहे.

आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव साबळे वाघिरे आणि कंपनी कायदेशीर प्रक्रियेनं नोंदवणार आहे, असे काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं होतं. कंपनीनं म्हटलं होतं की, नाव बदलण्यास थोडा वेळ दिला जावा, जेणेकरुन नवं नाव नोंदवता येईल. नवं नाव लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तसंच आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही, शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि ६० ते ७० हजार विडी कामगारांच्या प्रपंचावर कुऱ्हाडही येणार नाही.



हेही वाचा

कोरोना व्हॅक्सीन सुरक्षितच, कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याची गरज- राजेश टोपे

महाराष्ट्रात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण- राजेश टोपे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा