मुंबईत पुढील महिन्यापर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबईत बुधवारी 20 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन वर्षाच्या 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रकही जारी केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आल्याने 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.
याशिवाय सार्वजनिक सभांनाही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार कर्फ्यूच्या काळात शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कलम 144 मध्ये या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा