पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची घोषणा केली. देशात मध्य प्रदेशातील इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. इंदूरने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ शहर म्हणून अव्वल स्थान मिळवलं आहे.
पहिल्या १० शहरांत राज्यातून केवळ नवी मुंबईचा समावेश झाला आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरं स्थान पटकावलं आहे. पुण्याला २०२० च्या सर्वेक्षणात १५ वं स्थान प्राप्त झालं आहे. तर नाशिक आणि ठाणे अनुक्रमे ११ व्या आणि १४ व्या स्थानावर, तर नागपूर १८ व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा -
मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड
मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता