मुंबईच्या कमाल तापमानात (Temperature) सलग दुसऱ्याही वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना थंडीच्या महिन्यात उकाडा सहन करावा लागतो आहे. सोमवारी अचानक वाढलेल्या कमाल तापमानात केवळ दीड अंशाची घट होऊन ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं. तर सांगली, अहमदनगर, सोलापूर, जळगाव आणि रत्नागिरी इथं पारा ३५ अंशाच्यावर नोदविण्यात आला आहे.
सोमवारपासून
जमिनीवरून वाहणारे प्रभावी
आग्नेय वारे आणि आर्द्रतेचे
प्रमाण कमी असल्यामुळं
मुंबई आणि उपनगरातील तापमानात
अचानक मोठी वाढ झाली.
सोमवारी
संध्याकाळी
सांताक्रूझ इथं
कमाल तापमान ३८.१
अंश,
तर
बोरीवली (पू.)
इथं
कमाल तापमान ३९.४
अंशावर पोहचले होते.
मंगळवारी
त्यात दीड अंशाची घट झाली.
तर
किमान तापमान २२.४
अंश नोंदविण्यात आले.
राज्यभरात
मंगळवारी सर्वच ठिकाणी कमाल
तापमान ३० ते ३६ अंश सेल्सिअस
दरम्यान नोंदविण्यात आलं.
मध्य
महाराष्ट्रात किमान तापमान
१५ अंश सेल्सिअसवर आणि विदर्भ,
मराठवाडय़ात
१५ अंशाच्या खाली होते.
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर उर्वरित भागात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं ११.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हेही वाचा -
फक्त राज्यातच का? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार
१५ मजली इमारतीवरून उडी मारून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या