Advertisement

ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे शहरातील विविध जलवाहिन्यांच्या जोडणीचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे.

ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे शहरातील विविध जलवाहिन्यांच्या जोडणीचं आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी ठाण्यात पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच पुढील एक ते दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

घोडबंदर भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ११५८ मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जोडणी मेट्रो प्रकल्पाच्या कामात अडसर ठरत आहे. त्यामुळे ही जोडणी याच वाहिनीवर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. याशिवाय साकेत येथील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह दुरुस्ती, बाळकुम जलकुंभाच्या वाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलणे आणि सोहम संप येथे नवीन विद्युत पॅनल बसविणे ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील  पाणीपुरवठा शुक्रवारी १८ सप्टेंबरला सकाळी ९ ते शनिवार १९ सप्टेंबरला सकाळी ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

 घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, गांधी नगर, जॉन्सन, इटर्निटी, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतीबंदर आणि कळव्याचा काही भागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.



हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू

 गुड न्यूज! वकिलांनाही आता लोकलप्रवासाची मुभा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा