बोरीवलीहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या 3 पैकी 2 ट्रेन रद्द झाल्याने कांदिवली येथील महावीर नगरमध्ये मजुरांची प्रचंड गर्दी झाली आहे. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मजूर मात्र घरी जाण्याची मागणी करत आहेत.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पात मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या. त्या ट्रेन्समधून अनेक मजूरांना आपल्या राज्यात सुखरुप पाठवण्यात आले आहे. मात्र, गुरूवारी बोरीवलीहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या 3 पैकी 2 ट्रेन रद्द झाल्या. त्यामुळे आपल्या गावी निघाले मजूर कांदिवलीतील महावीर नगरमध्ये अडकले. शेकडो मजूर असल्याने या ठिकाणी चांगलाच गोंधळ माजला. पोलिसांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला. गर्दी झाल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रमिक ट्रेन रद्द झाल्याची ही पहिलीच घटना समोर येत आहे.
यापूर्वी लॉकडाऊनमध्ये वांद्रे स्थानकात घरी जाण्याच्या मागणीसाठी स्थलांतरीत मजूर एकत्रित जमले होते. मात्र त्यावेळेस ट्रेन सुरु झाल्याची चुकीची माहिती त्यांना देण्यात आली होती. परंतु, आता मजूरांच्या घरवापसीसाठी ट्रेन्स सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा -
खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर