भायखळा - मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी जुलूसचं आयोजन केलं होतं. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ई वॉर्ड विभागात मुस्लिम बांधवांची लोकसंख्या जास्त असून अनेक ठिकाणाहून जुलूस काढण्यात आली. याचीच दक्षता घेत भायखळ्यातील अनेक रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. तसंच बाबुराव जगताप मार्ग आणि मौलाना आजाद मार्ग बंद ठेवण्यात आला होता.