Advertisement

लाॅकडाऊनमध्ये शिथीलता देताच मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी

दादर, वरळी, यासारख्या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लाॅकडाऊनमध्ये शिथीलता देताच मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी
SHARES
मुंबईत लाँकडाऊनमध्ये मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांंनी शिथिलता देेेेताच, आज मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पहायला मिळाली. मागील दोन महिन्यांपासून लाँकडाऊनमुळेे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. दादर, वरळी, यासारख्या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशात लाॅ कडाऊन जाहिर केले. त्या दिवसापासून मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांंची वरदळ पूर्णतहा थांबली. गल्लोगल्ली पोलिसांनी नाकाबंदी लावत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली. आतापर्यंत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यावर 1 लाखाहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील काही शहर वगळता कमी झालेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंञी यांनी  लाँकडाऊनमध्ये शिथिलता जाहिर केली. त्यामुळे मुंबईच्या टोल नाक्यांवर आता वाहनांची पून्हा गर्दी दिसू लागली आहे.

मुंबईत दादर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा निदर्शनास येत आहे. तर पश्चिम उपनगरात  अंधेरी, वांद्रे जंक्शनजवळ वाहने धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमधील ही लाँकडाऊनमध्ये शिथीलता केल्याने मुंबईच येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचेच परिणाम वाशी, मुलुंड, दहिसर टोल नाक्यांवर दिसून येत आहे. या ठिकाणी वाहनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे.त्यामुळेे लाँकडाऊनमध्ये जरी शिथिलता दिली असली. तरी धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी समजून शक्यतो घराबाहेर न पडावे. बाहेर पडल्यास सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन पोलिस ठिक ठिकाणी करत आहेत.

राज्यात सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार  शुक्रवारपासून अनलॉकडाउन 1.0 ला सुरुवात होत आहे. मागच्या 2 महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकानं सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचे आपल्याला पालन करावे लागले.

नियम व अटी

  • मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. 
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येणार आहे.
  • पहाटे 5 ते रात्री 7 या वेळेत नागरिकांसाठी उद्यानं, मैदानं खुली करण्यात आली आहेत. 
  • यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.
  • दुकान सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. 
  • एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. 
  • नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. 
  • यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं असेल.
  • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. 
  • कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.
  • रविवारपासून म्हणजेच 7 जून 2020 पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
  • यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
  • शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. 
  • ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा