डावखुरा फिरकी गोलंदाज अायुष झिमरेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वरळी केंद्राने कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अाज पालघर संघाला अडचणीत अाणले अाहे. माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबवर सुरू असलेल्या या सामन्यात अायुष झिमरेने पालघर संघाच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी पालघर संघाचा डाव १९४ धावांवर अाटोपला अाहे.
वरळी केंद्राने नाणेफेक जिंकून पालघर संघाला प्रथम फलंदाजीस अामंत्रित केले. पण अादित्य वारंग (४५), प्रिन्सली परेरा (३०) अाणि अमन तिवारी यांचा अपवाद वगळता पालघर संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या रचण्यात अपयश अालं. वरळी केंद्राकडून अायुष झिमरे यानं चार फलंदाजांना माघारी पाठवलं. प्रिन्स बदियाणी अाणि अोमकार खोत यांनीही त्याला चांगली साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकांचा कालावधी असताना वरळी केंद्राने सावध सुरुवात केली. वरळी केंद्राने एकही विकेट न गमावता ९ षटकांत बिनबाद २९ धावा केल्या अाहेत. शनिवारी अंतिम सामन्याचा शेवटचा दिवस असणार अाहे. विजेत्यांना भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार अाहे.
हेही वाचा -