Advertisement

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विरार-पालघर केंद्र विजयी


कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विरार-पालघर केंद्र विजयी
SHARES

न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब अायोजित २८व्या एलअायसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत विरार-पालघर संघाने वरळी केंद्राचा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात अाले. या वेळी गावस्कर यांनी युवा क्रिकेटपटूंना मोलाचे मार्गदर्शनही केले.


वरळी केंद्राचा डाव गडगडला

माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात विरार-पालघर संघाने पहिल्या दिवशी सर्वबाद १९४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, वरळी केंद्राला सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करता अाली नाही. अमन तिवारी अाणि अारोन राॅड्रिग्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वरळी केंद्राला १७१ धावांपर्यंतच मजल मारता अाली. गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या अायुष झिमरेने फलंदाजीतही ८७ धावांचे योगदान दिले.


हे ठरले स्पर्धेत सर्वोत्तम

सामनावीर : आयुष झिमरे
सर्वोत्तम फलंदाज : आदित्य आनंद
सर्वोत्तम गोलंदाज : यश क्रिपाल
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : ओमकर मळेकर
सर्वोत्तम यष्टीरक्षक : साई चव्हाण
होतकरू जलद गोलंदाज : प्रिंस बदियानी
होतकरु खेळाडू : तन्मय बुरम
मालिकावीर : आयुष झिमरे


हेही वाचा -

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत पालघर संघ अडचणीत

पडद्यामागचे पाठीराखे खूपच महत्त्वाचे - जेमिमा रॉड्रिग्ज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा