राज्याच्या कारागृहांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेसंदिवस वाढू लागला आहे. राज्यातील ५९६ तर मुंबईतील १८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. तर कारागृहातील १६७ कर्मचारी ही कोरोना या महामारीने त्रस्त आहेत. तर या महामारीने आतापर्यंत ४ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्वा कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
A total of 596 inmates and 167 jail staff have tested positive for COVID-19 in jails of Maharashtra till date. Highest 219 inmates and 57 jail staff have contracted the infection in Nagpur Central Prison: State Prison Department pic.twitter.com/dohFLJrtZ9
— ANI (@ANI) July 10, 2020
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्चन्यायलयाने राज्य सरकारकडे जैलमधील कैद्यांबाबत विचारपूस केली होती. त्यात त्यांनी जेलमधील कैद्यांमध्ये कोरोना संसर्ग आहे का? अशी विचारणा केली होती. कोरोना प्रादर्भाव वाढु लागल्याने, याचा संसर्ग कारागृहातील कैद्यांना बसू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहातुन तब्बल ११ हजारहून अधिक कैद्यांची प्रशासनाने टप्या टप्याने सुटका केली. कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात आले. तर काही कारागृहात थर्मल टेम्परेचरच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस आले. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे.
हेही वाचाः- लॉकडाऊनचा बेस्टला फटका; तब्बल १५० कोटींचा तोटा
दरम्यान हजारो कैद्यांना सोडून देखील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. , राज्यातील ५९६ तर मुंबईतील १८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यात कारागृहातील १६७ कर्मचारी ही कोरोना या महामारीने त्रस्त असून या पूर्वी ९३ जणांनी कोरोनावर मात केलेली आहेत. तर या महामारीने आतापर्यंत ४ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर २८१ कैद्यांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील कारागृहातही कोरोनाची लागण झपाट्याने होत असतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई सेंट्रल जेलमध्ये आतापर्यंत १८१ कैदी आणि ४५ जेल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १७७ कैदी आणि ३९ जेल कर्मचा-यांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचाः- म्हणून गणपती मंडळांकडून पालिका लिहून घेणार ‘विशेष हमीपत्र’