मुंबई - महिला, तरुणींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलं असताना आता अल्पवयीन निरागस, अजाण चिमुकलींवरील लैंगिक अत्याचारातही वाढ होतेय. शाळेत, कॉलेजला जाताना टवाळ मुलांचा आणि अत्याचार प्रवृत्तीच्या नराधमांचा सामना कुठल्या ना कुठल्या मुलीला करावाच लागतो. त्यामुळे मुली किती सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण झालाय.
या सगळ्यांवर आळा बसावा यासाठी पोलीस पुढे सरसावलेत. त्याचधर्तीवर पोलीस दीदी हा उपक्रम राबण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या 'दीदी' या उपक्रमामुळे तरी या नराधमांवर आळा बसेल अशी आशा करायला हरकत नाही.