चिडवल्यामुळे रागाच्या भरात केली मित्राची हत्या


चिडवल्यामुळे रागाच्या भरात केली मित्राची हत्या
SHARES

मित्राने चिडवले म्हणून दुसऱ्या मित्रांनी त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली आहे. गुरुवारी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.


हत्येनंतर मित्र फरार

18 वर्षीय मृत आकाश वानखेडे, दीपक तायडे आणि दोघे अल्पवयीन मित्र एकमेकांना चिडवत होते. त्यातच यांच्यात मोठा वाद झाला आणि वादाचे रूपांतर शत्रुत्वात झाले. खरेतर यामधील तीन मित्रांचा आकाश वानखेडेवर राग होता. याच रागाच्या भरात त्या तिघांनी आकाशचा वचपा काढण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे बुधवारी त्याला भांडुप पाईपलाईनजवळ बोलावून घेतले आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. नंतर सर्वजण पसार झाले.

त्यानंतर 24 तासांच्या आत आरोपींना पकडण्यात भांडुप पोलिसांना यश मिळाले. आरोपींवर आता कलम 346/17 आणि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी दोन आरोपी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.



हेही वाचा - 

मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या

मानसिक रुग्णाची हत्या, एकाच कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा