महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या मागील तपास यंत्रणांचा ससेमीरा अद्याप संपलेला नाही. प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई करीत भुजबळ कुटुंबीयांची देशभरातील 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
भुजबळ मार्च 2016 पासून आर्थररोड तुरुंगात आहेत. तेव्हापासून देशातील सर्व तपास यंत्रणांनी भुजबळांच्या मागे तपासाचा ससेमीरा लावला आहे. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांमधून घेतलेल्या मालमत्तेवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे देखील वाचा -
दीड वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळात ठेवणार 'पहिलं पाऊल'
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)