मुंबईत पोलीसच असुरक्षित ?


मुंबईत पोलीसच असुरक्षित ?
SHARES

 

एकीकडे पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूला 24 तास उलटत नाही तोच गुरुवारी दिवसभरात पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करण्याचे तब्बल 4 प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.

1 - अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात गाडी अडवल्याच्या रागावरून ट्रॅफिक वॉर्डन विश्वनाथ राणे यांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की करण्यात आली.

2 - कुलाबा परिसरात वाहतूक हवालदार राजेंद्र पवार यांनी काळ्या काचा असलेली गाडी अडवली असता त्यांना देखील शिवीगाळ तसेच धमकी देण्यात आली.

3 - डॉकयार्ड रोड येथे बाईकस्वाराने पोलीस हवालदार महादेव कुंभार यांना जखमी केले.

4 - कुर्ल्यात थांबण्याचा इशारा देऊनही इम्तियाझ खान नावाच्या उद्दाम चालकाने ट्रॅफिक हवालदार देविदास निंबाळकर यांच्यावर गाडी घालून जखमी केले.

पोलिसांवर होणा-या शिवीगाळ, हल्ले यासारख्या प्रकारांना नेमके कोण जबाबदार आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे पोलिसच मुंबईत सुरक्षित नाहीत, असे चित्र सध्या दिसत आहे.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा