प्रेषित मुहम्मद यांच्या तथाकथित वादग्रस्त विधानावरून देशभरात तणाव वाढला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना अल कायदाने देशभरातील अनेक शहरांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत.
अल कायदाच्या या धमकीनंतर मुंबईसह राज्यातील अनेक शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात स्फोटाचा इशारा देण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेत महाराष्ट्र सरकारने संवेदनशील भागांवर दगड बाटल्यांच्या हल्ल्याच्या शक्यतेवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालय लवकरच या संदर्भात एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्रालयांचे सचिव उपस्थित राहणार आहेत.
AQIS ने 6 जून रोजी धमकीचे पत्र दिले होते. या पत्रात दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पत्रानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे.
भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये त्यांचा अंत होण्याची वाट पाहावी, असे या पत्रात म्हटले आहे. अल-कायदाने विशिष्ट शहरांची नावे घेऊन धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा