माटुंगा - तेरावे महाविद्यालयीन साहित्य संमेलन खालसा कॉलेजच्या सभागृहात शनिवारी झाले. या वेळी मराठी चित्रपट बदलतोय का? याविषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता. या परिसंवादात वंदना गुप्ते आणि विवेक पुणतांबेकर यांनी सहभाग घेतला. या संमेलनाचे अध्यक्षपद कवी प्रवीण दवणे यांनी भूषवले तर उद्घाटन शाहीर नंदेश उमप यांच्या हस्ते झाले.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे, लेखक पंढरीनाथ रेडकर, लेखिका प्रतिभा सराफ यांनी उपस्थिती दर्शवली.