Advertisement

...अन्यथा 11वीचा प्रवेश रद्द होईल!


...अन्यथा 11वीचा प्रवेश रद्द होईल!
SHARES

शनिवारपासून आकरावीच्या दुसऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनला सुरुवात झाली आहे. मात्र प्रवेश घेताना सादर केलेल्या कागदपत्रात तफावत असल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. तशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी प्राचार्य आणि मुख्यध्यापकांना दिल्या आहेत.


...तर प्रवेश रद्द केला जाईल

अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येत असलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. ऑनलाईन प्रवेश घेताना अर्जात नमूद केलेले आरक्षण आणि इतर माहितीमध्ये तफावत असल्यास प्रवेश ऑनलाईनच रिजेक्ट केले जाणार आहेत. प्रवेश रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द केल्याबाबत संगणकीकृत पावती तात्काळ देण्यात यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत.


प्रवेश घेणे अनिवार्य

अकरावीच्या दुसऱ्या यादीतील प्रवेश २४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना घेता येणार आहेत. त्यानंतर २९ जुलैला तिसरी यादी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंती क्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे.



हेही वाचा

अकरावीची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर

११ वीचे १० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा