Advertisement

अकरावी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ; पालकांना दिलासा!


अकरावी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ; पालकांना दिलासा!
SHARES

अकरावीला प्रवेश घेण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागानं एक दिलासादायक घोषणा केली आहे. याआधीच्या मुदतीनुसार 13 जुलै ही 11वीच्या प्रवेशासाठीची शेवटची मुदत होती. मात्र आता ही मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 14 जुलैपर्यंत 11वी प्रवेश घेता येणार आहेत. १४ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे, असं शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केलं आहे.

अकरावीची पहिली यादी सोमवारी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना आपला नंबर कोणत्या कॉलेजला लागलाय हे कळेपर्यंत मंगळवार उजाडला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी अॅडमिशन घेता आलं नव्हतं. त्यामुळे अॅडमिशनसाठी केवळ दोनच दिवस उरले. त्यामुळे प्रवेशासाठी वेळ वाढवून दिला जावा अशी मागणी होत होती.


अकरावी प्रवेशामध्ये आल्या होत्या अडचणी

मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असून आतापर्यंत 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने सुरूवातीच्या टप्प्यातील प्रवेशप्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. त्यानंतर सर्व्हर अपडेट करण्यासाठी एक संपूर्ण दिवस मुंबईत ऑनलाईन प्रक्रिया थांबवण्यात आली. दुरूस्तीनंतर प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. 


याआधी काय झालं होतं?

अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवारी 5 वाजता जाहीर होणार होती. मात्र ऑनलाईन प्रवेश प्रकियेची तांत्रिक जबाबदारी सांभाळणाऱ्या 'नायसा' कंपनीने घोळ घातल्याने सोमवारी रात्री 12 वाजले तरी यादी जाहीर होऊ शकली नाही. वेबसाईटवर तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून उपसंचालकांनी हात वर केले. यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा