हरियाणातील रायन स्कूलमध्ये चिमुकल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येमुळे संपूर्ण देश हदरला आहे. प्रत्येक पालकांच्या मनात आता मोठी धाकधुक निर्माण झाली आहे. आपले मुल त्या शाळेत जाते ती शाळा सुरक्षित आहे ना, आपले मुल सुरक्षित आहे ना? याचीच काळजी आता पालकांना लागली आहे.
या घटनेनंतर पालकांमध्येही जागरुकता निर्माण होऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी शाळांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. असे असताना प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. लाखोंचे शुल्क उकळणाऱ्या शाळा असो वा सरकारी शाळा सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना असणे गरजेच आहे. तेव्हा पालकांनो तुमच्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी हे कराच.
स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा, आसनांपेक्षा जास्त विद्यार्थी भरले नाहीत ना, याची खात्री पालकांनी अवश्य करून घ्यावी. त्याचप्रमाणे शाळेत ने आण करणाऱ्या बसेसचा शाळेशी करार झाला आहे की नाही? बसमध्ये महिला मदतनीस आहे की नाही? बसच्या ड्रायव्हरवर कोणताही गुन्हा दाखल नाही ना? या सगळ्यांची खात्री करून घेतली पाहीजे.
या वरील गोष्टी तुमच्या शाळेत नसतील तर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता.
हे ही लक्षात घ्या...
शाळेत मुलावर झालेल्या अत्याचाराविरोधात त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. एखादी घडलेली घटना पोलिसांपर्यंत त्वरीत पोहचणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी 'पोलिस मित्र' या अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपद्वारे आपण लहान मुलांवरील अत्याचाराच्या तक्रारी करू शकता.
राज्यसरकारने २००५ साली बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना केली. लहान मुलांवर होणारे अत्याचार, लौंगिक शोषण, बालविवाह याविषयीच्या तक्रारी आपण या ठिकाणी करू शकता.
ज्ञानदेवी संस्थेने २००१ मध्ये चाईल्ड लाईन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत बालकामगार, शारीरिक अत्याचार, हरवलेली मुले, लैंगिक शोषण, बालविवाह, बालगुन्हेगारी अशा विषयांवर कामे केली जातात.
त्यामुळे आता आपले शाळेत गेलेले पाल्य सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर वरील गोष्टींची पालकांनी खात्रीकरून घेणे आवश्यक आहे.
प्रद्युम्न हत्या प्रकरण, पोलीस हे खबरदारीचे उपाय करणार!
स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार