Advertisement

महाराष्ट्र बंदमुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, ६ जानेवारीला होणार पुन्हा परीक्षा


महाराष्ट्र बंदमुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, ६ जानेवारीला होणार पुन्हा परीक्षा
SHARES

आंबेडकरी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर थेट परिणाम झाला. याचा मुंबई विद्यापीठातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका बसला. अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची येत्या ६ तारखेला पुन्हा एकदा परीक्षा घेण्याच्या सूचना परीक्षा व मूल्यमापान मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी महाविद्यालयांना केल्या आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


तेच परीक्षा केंद्र

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्याचे पडसाद मुंबईतही उमटणार हे निश्चित होते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या जवळपास १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा असल्याने विद्यापीठातर्फे सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. या परीक्षांसाठी १ तास उशिरा पोहोचण्याची सवलत विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे दिली होती. मात्र, शहरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि रेल्वे रोको करण्यात आल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचणं विद्यार्थ्यांना शक्य झालं नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून सुधारित निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि परीक्षा व्यवस्था तीच ठेवून ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.


विद्यार्थी संघटनांची मागणी

उशीरा पोहोचूनही विद्यार्थ्यांचं नुकसानच होणार असल्याने अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाचं दार ठोठावून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. काही पालकांनीही परीक्षा विभागाकडे तक्रार केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने नवं परिपत्रक जाहीर केलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा