Advertisement

कोरोनामुळं पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाही- उदय सामंत

परीक्षा रद्द केल्या जाणार नसून याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

कोरोनामुळं पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाही- उदय सामंत
SHARES

कोरोनामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा कॉलेज बंद करण्यात आले आहेत. तसंच, परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असून, काही परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा यापुर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं विद्यार्थी आणि पालक वर्गात या परीक्षांसंदर्भात संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षांच्या नियोजन आणि नियंत्रणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षा रद्द केल्या जाणार नसून याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचं वेळापत्रक नव्यानं जाहीर करण्यात येणार आहे. या सर्व परीक्षेचं नियोजन आणि नियंत्रणासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली आहे. 

ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचं वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वषार्चे नियोजन असा अहवाल देणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमध्ये विविध आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा बहुउपयोगी लॅब सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी बैठकीत दिल्या. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अशी लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. अन्य विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.  त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही सामंत यांनी दिली.



हेही वाचा -

हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक, मात्र ग्राहक नाही

कोरोनाग्रस्ताच्या घरातून पोपटाची सुखरूप सुटका



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा