मागील दोन वर्षात खास करून कोरोना काळात खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांकडे धाव घेतल्याचं चित्र आहे. 'असर' (ASAR) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण हे ९.५ टक्क्यांनी तर देशात ६ टक्क्यांनी वाढलं आहे.
सरकारी शाळांची पटसंख्या कमी होऊन अनेक सरकारी शाळा बंद करण्याची वेळ आली होती. मात्र, आता याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कोरोना काळात वाढलेली पाहायला मिळत आहे. २०१८ च्या तुलनेत यावर्षी ९.५ टक्क्यांनी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहे.
'असर' रिपोर्टमध्ये राज्यातील ९९० गावांतील ६ ते १६ या वयोगटातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३२.५ टक्क्यांवरून २४.४ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. त्यातही मुलांच्या तुलनेनं मुलींना शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.
सरकारी शाळांमध्ये प्रवेशाची कारणं