Advertisement

अमित्रियान बनला 'शेतकऱ्यांचा शिवाजी'!


अमित्रियान बनला 'शेतकऱ्यांचा शिवाजी'!
SHARES

काही कलाकार अभिनयासोबतच आपल्या देहबोलीमुळेही सर्वांच्याच स्मरणात राहतात. त्यामुळेच कोणी गॅाडफादर नसतानाही ते चंदेरी दुनियेत आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. असाच अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता अमित्रियान पाटील आता 'शेतकऱ्यांचा शिवाजी' बनून अवतरणार आहे.


अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर


अमित्रियानबाबत सांगायचं तर त्याने यापूर्वी 'सत्या २', 'मन्या - दि वंडरबॉय', '३३२ मुंबई टू इंडिया', 'राजवाडे अँड सन्स' अशा काही निवडक, पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. पदार्पणापासून आजवर त्याने नेहमीच विविधांगी भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. आता पुन्हा एकदा त्याचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे.


मुख्य भूमिकेत


'आसूड' या आगामी मराठी चित्रपटात अमित्रियानने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एका कणखर रांगड्या शेतकरी युवकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. याबाबत तो म्हणाला की, आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी आहे. आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी डॅशिंग भूमिका मी यात साकारली आहे. या व्यक्तिरेखेचं नाव शिवाजी पाटील असून, बीएससी अॅग्रीकल्चर असणारा हा तरुण शेती व्यवसायाचा तिरस्कार करत असतो. कालांतराने काही घटना अशा घडतात की, शिवाजीला शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यवस्थेविरोधात 'आसूड' ओढावा लागतो. त्यामुळेच त्याला शेतकऱ्यांचा शिवाजी म्हटलं आहे.

तरूण पिढीचा आत्मविश्वास पडद्यावर


अमित्रीयानसोबत या चित्रपटात विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत, राणा जंगबहादूर, अवतार गील या कलाकारांच्या भूमिका आहेत. याशिवाय रश्मी राजपूत हा नवा चेहराही या सिनेमात दिसणार आहे. व्यवस्था बदण्यासाठीचा जबरदस्त आत्मविश्वास आजच्या पिढीत आहे. या तरुण पिढीने मनात आणलं तर ते व्यवस्था नक्कीच बदलू शकतात हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न 'आसूड' या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.


फेब्रुवारीत आसूड प्रदर्शित


'आसूड'चं लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केलं असून, सहदिग्दर्शनाची जबाबदारी अमोल ताले यांनी पार पाडली आहे. कथा–पटकथा-संवाद निलेश जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद, तर संकलन सचिन कानाडे यांचे आहे. ८ फेब्रुवारीला 'आसूड' प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

'मनसे'च्या पानसेंना राऊतांनी केलं ना'राज'?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून दया बेनची एक्झिट?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा