Advertisement

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये नव्या पात्राचा प्रवेश?


'तुझ्यात जीव रंगला'मध्ये नव्या पात्राचा प्रवेश?
SHARES

टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी'वरील मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ती अगदी नकारात्मक व्यक्तीरेखा असलेली नंदिता वहिनी असो, ते सर्व महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. नुकतंच आपण मालिकेत पाहिलं कि गायकवाडांना त्यांचा वाडा परत मिळतो. हा आनंद साजरा करण्यासाठी वाड्यात मोठा समारंभ आयोजित केला जातो. गावकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आबा गावातल्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे आभार मानतात आणि त्यांचे पैसे देखील परत करतात. सगळीकडे आनंदीआनंदाचं वातावरण आहे. वाडा तर परत मिळाला, पण आता जमीन परत मिळवण्याचे अतोनात प्रयत्न घरातील सदस्य करत आहेत.



आबा आता राणा अंजलीला 'मुलाचा विचार करा' असं सुचवतात. आबांनी अचानकपणे मुलाचा विषय काढल्याने राणा अंजली बावरतात. आपण या नव्या जबाबदारीसाठी तयार आहोत का? हे दोघांनाही आत्ता कळत नाहीये. पण त्यांच्याकडे लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अाबांनी सांगितल्याप्रमाणे, राणा आणि अंजली खरंच बाळाचा विचार करणार आहेत का? हा नवा पाहुणा कोण असणार आहे? त्याच्या आगमनाने राणा आणि अंजलीचं आयुष्य कसं बदलणार आहे? हे पाहणं खूपच रंजक ठरेल.



हेही वाचा

बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा