Advertisement

मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची चाके धुतली जाणार

बीएमसीने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची चाके धुतली जाणार
SHARES
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची चाचपणी सुरू केली आहे.

बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे धूळ शहरात शिरू नये, यासाठी वाहनांची चाके धुण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. यासाठी सर्व प्रवेशद्वारांवर 'वॉटर जेट स्प्रे मशीन' बसवण्यात येणार असल्याची माहिती बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गुरुवारी दिली.

मुंबईतील (Mumbai) प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यामुळे प्रशासन कामाला लागले असून प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायांची चाचपणी सुरू आहे.

इतर शहरातून येणाऱ्या वाहनांच्या चाकांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते. त्यामुळे आता शहरात प्रवेश करण्यापूर्वी ही चाके पाण्याने धुतली जाणार आहेत. त्यासाठी गाड्या थांबवण्याची गरज भासणार नाही. चालत्या वाहनांच्या चाकांवरच पाणी फवारले जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, धूळ कमी करण्यासाठी दररोज 650 किमी रस्ते धुतले जातील, असेही ते म्हणाले.कचराभूमीवर कचरा जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

कृत्रिम पावसाचा प्रयोग : हवेतील धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाऊ शकतो. चहलने स्पष्ट केले की दिल्लीत 'क्लाउड सीडिंग' होणार आहे आणि जर ते यशस्वी झाले तर मुंबईतही कृत्रिम पावसाची चाचणी घेतली जाईल. तो यशस्वी झाल्यास मुंबईतही कृत्रिम पावसाची चाचणी घेतली जाईल, असे चहलने स्पष्ट केले. 

यापूर्वी महापालिकेने धरण परिसरात अनेकवेळा कृत्रिम पावसाचे प्रयोग केले आहेत. पण हे सर्व प्रयोग फसले. पैशाच्या उधळपट्टीची टीकाही महापालिकेला सहन करावी लागली. 



हेही वाचा

मुंबई : कामा रुग्णालयात दुसरे मियावाकीचे जंगल फुलणार

दिवाळीत मुंबईत पावसाची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा