ताैंते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबई नजीकच्या समुद्रामध्ये दोन मोठे जहाज भरकटल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एक जहाज तेल उत्खननाचं काम करणारं असून दुसरं ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आहे. या दोन्ही जहाजावर मिळून ४०० हून अधिक जण असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही जहाजांच्या मदतीला युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा- Cyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन
#CycloneTauktae: Indian Navy Search & Rescue.
— All India Radio News (@airnewsalerts) May 17, 2021
In response to another SOS received from Barge 'GAL Constructor' with 137 people onboard about 8NM from Mumbai INS Kolkata has been sailed with despatch to render assistance. pic.twitter.com/owR83jahsQ
मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौंते चक्रीवादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भरकटली. या बोटीवर कामगार आणि इंजिनियर्स असे मिळून एकूण २७३ जण असल्याची माहिती समोर येत आहे. ही बोट जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई बंदराजवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयएनएस कोच्ची ही युद्धनौका या बोटीच्या बचावासाठी पाठवण्यात आली आहे.
तर ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ मैल अंतरावर समुद्रात भरकटलं आहे. या जहाजावर एकूण १३७ जण आहेत. हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका तातडीने त्यांच्या मदतीसाठी पाठवली आहे.
या दोन्ही जहाजांमध्ये चारशेहून अधिकजण असल्याने त्यांना वाचवण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहेत.