Advertisement

यापुढे प्लास्टिक वापराल तर, होईल ३ महिन्यांची शिक्षा!

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला २५ हजार रुपये दंड तसंच ३ महिन्याच्या कारवासाची शिक्षा होणार आहे.

यापुढे प्लास्टिक वापराल तर, होईल ३ महिन्यांची शिक्षा!
SHARES

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलच्या ताट-वाटे पेले यांच्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितलं. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला २५ हजार रुपये दंड तसंच ३ महिन्याच्या कारवासाची शिक्षा होणार आहे.


मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून याबाबत सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी विधानसभेत केलं. प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या पिशव्या, थर्माकोलच्या वस्तू, प्लास्टिक पाऊच, प्लास्टिकच्या वेष्टनातील उत्पादने, त्याची साठवणूक, विक्री करण्यावरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.



'यांना' वगळलं

मात्र, औषधांच्या वेष्टनांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, वन व फलोत्पादनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक या निर्णयातून वगळण्यात आले आहे. याबाबत नवीन नियमावली करण्यात आली आहे. ठळकपणे या उत्पादनांचा वापर कशासाठी केला जाणार आहे, हे नमूद करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तसंच आयात-निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर औद्योगिक वापर असल्याचं नमूद करावं लागणार आहे.


दूधासाठी जाड पिशव्या

दूधाच्या पॅकेजिंगसाठी ५० मायक्रॉनपेक्षा जाड पिशव्या वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पिशव्यांचा पुनर्वापरासाठी असलेली नोंद पिशव्यावर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच या पिशव्यांचा पुनर्वापराचा खर्च प्रत्येकी ५० पैशांपेक्षा कमी खर्च असावा, असे दूध डेअरींना उत्पादकांना सूचित करण्यात आलं आहे. या पिशव्यांची पुर्नखरेदीही बंधनकारक करण्यात आली आहे.


पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर

प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्यांचा पुनर्वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. या वस्तूंना प्रतिबंधित करण्याऐवजी वस्तू आणि सेवा कर संचालनलयाकडून उत्पादन स्तरावर प्रत्येक आकारमानानुसार पुर्नवापर आणि फेररचना शुल्क आकारण्यात येणार आहे. किरकोळ विक्री स्तरावर मनपा, नगरपंचायतीकडून कर वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फेरवापराद्वारे मिळणारा जीएसटीचा परतावा, फेरवापर करणाऱ्या उत्पादन कंपन्यांना परत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! प्लास्टिकच्या बाटल्यांना लवकरच बंदी

शासकीय कार्यालयांत आता प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांना बंदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा