मुंबईसह रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर गुरुवारी आणि शुक्रवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं १९ सप्टेंबर या दिवशी रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याबाबत ५ महत्त्वाचे मुद्दे...
१)
हवामान खात्यानुसार मुंबईसोबतच पालघर, वाशी,
ठाणे,
खारघर,
रायगड,
नेरुल,
पनवेल,
बदलापूर आणि जवळपासच्या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
२) बुधवारी रात्रीपासूनच काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसभर आणि रात्री ३८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
Heavy rainfall today & extremely Heavy Rainfall warning in Mumbai City & Suburbs for the next 24 hrs, issued by #IMD . We request #Mumbaikars to avoid venturing around the sea & into water logged areas. Please take care and be careful. For any assistance #Dial1916
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2019
३)
पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रिपोर्टनुसार, मुंबईत यावर्षी संपूर्ण मोसमातील
(जून ते सप्टेंबर) एकूण पावसाचं प्रमाण गेल्या सत्तर वर्षांतील सर्वाधिक नोंदीच्या जवळ पोहोचलं आहे. पुढील दोन आठवड्यांत हा आकडा ओलांडून मोसमातील सर्वाधिक पावसाची नवी नोंद या वर्षी होण्याची शक्यता आहे.
४) पावसात मुंबईची तुंबई होणं, ट्रॅफिक जाम होणं हे काही नवीन नाही. मुंबईत मुसळधार पाऊस झाला की पाणी भरतं. त्यानंतर ट्रेन आणि विमान सेवेवर परिणाम होतो. यामुळे पालिकेनं ट्वीट करत गुरुवारी आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा असा इशारा दिला आहे.
IMD issued Extremely heavy rainfall warning at isolated places in Mumbai City and Suburbs in next 48 Hours. #Monsoon2019 #MCGMUpdates #MumbaiRains #SafeMonsoon pic.twitter.com/K26tJZZsSm
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2019
५) हवामान खात्यानं दिलेला इशार लक्षात घेता मुंबई आणि ठाणे परिसरातील सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शाळाच नाही तर कॉलेज देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
६) समुद्रावर ताशी ६५ किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उत्तर कोकणातील किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तर गुरुवार आणि शनिवार या काळात दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणं धोकादायक असेल.
Places like #Mumbai, #Thane and #Dahanu may witness a few intense spells of rain leading to waterlogging and traffic jams. #MumbaiRains https://t.co/NIF1xF9kec
— SkymetWeather (@SkymetWeather) September 18, 2019
७) मुंबईकर पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्र किनारी जातात. त्यामुळे फक्त मच्छिमारांनाच नाही तर मुंबईकरांना देखील समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.