Advertisement

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

शनिवारी मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर
SHARES

शुक्रवारी दिवसभर मुंबई-ठाणे- नवी मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावली होती. तर शनिवार आणि रविवार देखील मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

कोकणात पुढच्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईत सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत ५४.७८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना आणि मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबई- पुण्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं धरणं ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. पुढचे दोन दिवस पावसाचे असून विदर्भ आणि कोकणात मुसधार तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. 



हेही वाचा

२९ ऑगस्टपासून मुंबईतील पाणी कपात रद्द

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा