जून महिन्याच्या पहल्याच दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं मुंबई विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली परंतु, या वादळाच्या दुसऱ्या दिवशीपासून पावसानं चांगलीच विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळत असून, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या ४८ तासांत गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तळ कोकणात ११ ते १३ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे. १० अथवा ११जून रोजी मॉन्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होणार आहे. त्यानंतर १४ अथवा १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगानं वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे.
कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १२ जूनपासून मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनचं आगमन झाल्यानंतर वेगानं वाटचाल करणार असून, १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
हवमान विभागाचा इशारा
हेही वाचा -