चेंबूर - नवरात्रौत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर मंगळवारी देवींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. अजिज बाग,चेंबूर येथे आरसीएफ विभागातील देवींचे आणि घटांचे दुपारपासून तलावात विसर्जन करण्यात येत होते.
विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिकेने चांगली व्यवस्था केली आहे. तलाव भरपूर खोल असल्याने तराफ्याची सोय केली आहे. "तलावावर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आणि मोहरममुळे पोलिसांनीदेखील जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला आहे", असे आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिरीष राऊत यांनी सांगतले.