महाराष्ट्रात (maharashtra) शुक्रवारी कोरोनाच्या (coronavirus) ९ हजार ७९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ३४७ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १९८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५६,९९,९८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात एकूण १,३४,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील रोज नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ सुरू आहे. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली असून कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
ठाणे मंडळ एकूण २०५१
नाशिक मंडळ एकूण ९४१
पुणे मंडळ एकूण २६६५
कोल्हापूर मंडळ एकूण ३१०६
औरंगाबाद मंडळ एकूण २४२
लातूर मंडळ एकूण ३७१
अकोला मंडळ एकूण २५३
नागपूर एकूण १६९
हेही वाचा -
पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती
मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू