नवी मुंबईत बुधवारी (९ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३५५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २९,१६५ झाली आहे.
बुधवारी बेलापूर ८२, नेरुळ ४२, वाशी ५९, तुर्भे ४९, कोपरखैरणे ४४, घणसोली ४०, ऐरोली ३४, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ३४ नेरुळ ५३, वाशी २२, तुर्भे ४२, कोपरखैरणे ४९, घणसोली ५०, ऐरोली ४५ आणि दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५०५५ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६४० झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३४७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू
रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले