मुंबईत पावसाने अजून नीट हजेरी लावलेली नसतानाच डेंग्यूने मुंबईत शिरकाव केला आहे. चेंबूरमध्ये डेंग्यूचे ७ रुग्ण अाढळले असून झेन या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात अालं अाहे.
चेंबूरमधील झेन रुग्णालयातील डॉ. विक्रांत शाह म्हणाले, ''डेंग्यू झाल्याचे तीव्र तापाद्वारे समजते. डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या अंगातील पाण्याची पातळीदेखील कमी होते. इडिस डासाच्या संसर्गाने डेंग्यू होतो. यामध्ये बोन रॅकिंग फिवर म्हणजेच तीव्रज्वर होतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप, सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप'', असंही म्हणतात.
डेंग्यूवर उपचारास उशीर झाल्यास डेंग्यू अंतिम टप्प्यात येतो याला "डेंग्यू शॉक सिन्ड्रोम" असे म्हणतात . हा टप्पा सर्वात भीतीदायक असतो. कारण यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
हेही वाचा -
पावसाळ्यात त्वचेची 'अशी' घ्या काळजी !
घरातील स्वच्छता, शारीरिक दुर्बलतेवर होणार पाहणी