महाराष्ट्रात राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ८ हजार ०८५ रुग्ण आढळले. तर ८ हजार ६२३ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच २३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत ५८ लाख ०९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ०९८ इतकी झाली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १६ हजार ४६७ आहे. ठाण्यात १५ हजार ९३५, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ६१२ आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ३५३, साताऱ्यात ७ हजार ५९६, रत्नागिरीत ५ हजार ६१६, रायगडमध्ये ५ हजार ४५८, सिंधुदुर्गात ४ हजार ६७७, तर नागपूर जिल्ह्यात ३ हजार ४९८ झाली आहे.
नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३४० तर अहमदनगरमध्ये ३ हजार ४०८, औरंगाबादमध्ये १ हजार २२० आहे. नांदेडमध्ये ही संख्या ८२६ इतकी आहे. जळगावमध्ये ९३२, तसेच अमरावतीत ही संख्या ४२७ इतकी आहे. सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात ८९ आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १३ लाख ९८ हजार ५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ५१ हजार ६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २१ हजार ३७७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
हेही वाचा -
महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार
२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव