Advertisement

राज्यात ८ हजार ९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

आतापर्यंत ५९ लाख ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात ८ हजार ९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात शुक्रवारी ८ हजार ९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार ४५८ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ वर गेली आहे. तर मृत्यूदर २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात मृतांचा आकडा १ लाख २५ हजार ०३४  झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ५९९ मृत्यू हे एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये झाले आहेत.

आतापर्यंत ५९ लाख ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात १ लाख १२ हजार २३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा