राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना यामध्ये आणखी १२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यात आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. त्याशिवाय, ७० करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तसंच, ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यभरात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे.
सर्वेक्षण पथकं
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेले रुग्ण
मोदी सरकारचा धाडसी निर्णय, खासदारांची वर्षभरासाठी ‘इतकी’ वेतन कपात
आता तरी लपू नका, समोर या, अजित पवार यांनी कुणाला दिला इशारा?