अतिसौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचं घरीच विलगीकरण करता येईल शिवाय विलगीकरणाचा काळ संपल्यावर या रुग्णांची पुन्हा कोरोना चाचणी आवश्यक नसल्याचं आरोग्य विभागाने (coronavirus live updates asymptomatic or mild symptoms Covid 19 patients can home quarantine as per new guidelines of maharashtra health department) म्हटलं आहे. घरी विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला केवळ एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावं लागणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.
मार्गदर्शक सूचना
आरोग्य विभागाचे विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या मार्गर्शक सूचनां संदर्भातील पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. या पत्रानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केलं जातं. त्यातील अतिसौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना जर त्यांच्या घरातच विलगीकरणाची योग्य सुविधा उपलब्ध असेल तर, त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणं आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना चाचणीची आवश्यकता नसेल, असं या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा- घाटकोपर, भांडुपमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर घटला
गृह विलगीकरणासाठी काय आवश्यक?
वैद्यकीय मदत कधी?
गृह विलगीकरण कधीपर्यंत?
गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणं नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तिथून १७ दिवसानंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.